Friday, April 3, 2015

नवरा अकाली जाणं ही आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत दुर्दैवाची घटना आहे. स्त्री कितीही स्वावलंबी झाली तरी तिच्याकडे पाहण्याचा, तिला जोखण्याचा दृष्टीकोन अजूनही उदासीनच आहे. माणूस नुस्ता शरिराने गेला म्हणजे सर्व संपलं असं आपल्याकडे होत नाही कारण मागे हे भावनिक गुंता स्त्रीयांसाठी शिल्लक असतोच. अशाच एका गुंत्याची उकल करण्याचा यत्न कवी गीतेश गजानन शिंदे यांनी ’नवरा वारल्यावर’ या कवितेतून केला आहे. तुम्हाला विशेष करुन स्त्रीयांना या कवितेबद्दल काय वाटतं हे कवितेखाली लिहा. तसेच विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" हा ब्लॉग लाईक आणि शेअर करुन या काव्य चळवळीत सहभागी व्हायला विसरु नका मित्रांनो...


No comments:

Post a Comment