Tuesday, July 7, 2015

काल-परवाच शाळेत जाऊ न शकणा-या मुलांचे गाजावाजा करत सर्वेक्षण करण्यात आले... शिक्षण महाग होत चाललंय नि दर्जा बद्दल तर बोलायलाच नको... इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी आणि शिकवणारी माणुसकी शुन्य नविन पिढी तयार होतेय... आपली भाषा घरात बोलणंही दूरापास्त होऊन बसलंय... हे झालं शहरातलं... पण गावात मुलं आहेत तर शिक्षक नाहीत ही परिस्थिति स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनी सुध्दा बदललेली नाही... आणि जिथे शिक्षक आहेत तिथे मुलं शेतमजूर म्हणून राबताहेत... हा समतोल तर कधीच साधता येणार नाही... फक्तं समित्या आणि अहवाल या कात्रीत शिक्षण अडकून पडलंय... याच संदर्भातली कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची एक अप्रतिम कविता...आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण हा प्रपंच तुम्हालाच वाढवायचाय...
[ Narayan Kulkarni Kavathekar - Poet - Kavita Mana Manatali ]

No comments:

Post a Comment